
मुलुंडमध्ये मराठी माणसाला एका गुजराती सोसायटीत कार्यालय भाड्याने देण्यास नकार दिल्यानंतर भाषिक वाद व प्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तसेच यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
मुंबई – मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. तसेच मुलुंडमध्ये मराठी माणसाला एका गुजराती सोसायटीत कार्यालय भाड्याने देण्यास नकार दिल्यानंतर भाषिक वाद व प्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तसेच यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
हा एवढा माज कोठून आला ?मुलुंड मध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे.हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे.भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डावउधळला…
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 28, 2023
हा एवढा माज कोठून आला?
दरम्यान, या प्रकारानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. “हा एवढा माज कोठून आला? मुलुंड मध्ये मराठी जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे.हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे.भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डावउधळला जाईल.जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले.तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र!” असं ट्विटमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. यानंतर आज यावरुन राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.