उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी संकटाला कधीच संकट मानत नाही, तर संकटात…’

'मी संकटाला कधीच संकट मानत नाही, तर संकटात संधी शोधण्याचं काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान (Maharashtra Politics) असेल तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते आणि ही लढाई आम्ही जिंकणारच', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

    मुंबई : ‘मी संकटाला कधीच संकट मानत नाही, तर संकटात संधी शोधण्याचं काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान (Maharashtra Politics) असेल तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते आणि ही लढाई आम्ही जिंकणारच’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. ‘जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, ते आता तोडून-मोडून टाकलं जात आहे. ते स्वप्न आणि हिंदुत्व आमचं नव्हतं’, असेही त्यांनी सांगितले.

    मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, कठीण काळात कोण बरोबर येतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण, पुजा असली की, सर्वजण तीर्थप्रसादाला येतात. पण, संकटसमयी कारणे सांगून दूर पळतात. आपल्याकडं गुरु विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरु आणि वडील चोरणारी लोकंही आहेत. चोरी करु द्या, पण संस्कार कधी चोरु नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

    आताच आपण डोळे उघडले नाहीतर…

    बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आपण माणूस म्हणून जन्म घेतला असून, धर्म नंतर आपल्याला चिकटला आहे. त्याच धर्माचा आधार घेऊन देशावर कब्जा करायचा आणि सर्वांना गुलाम करायचं सुरु आहे. आताच आपण डोळे उघडले नाहीतर; परत मिटलेले डोळे कधीच उघडता येणार नाही. त्यामुळे आतातरी सर्वांनी जागं व्हावं, असे सांगायला ते विसरले नाहीत.

    बाळासाहेबांची आजही हवा कायम

    बाळासाहेब ठाकरेंचं भरपूर चाहते होते. त्यांना चाहत्यांची आवश्यकता कधीही पडली नाही. कोठेही गेलं, तरी चाहतेच चाहते असायचे. देशात बाळासाहेबांची तेव्हापासून सुरु झालेली हवा आजही काय कायम आहे. तसेच मी कधीच संकटाला संकट मानत नाही. संकटात संधी शोधण्याचं काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान असेन तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते. अन् ही लढाई आम्ही जिंकणारच, असेही त्यांनी सांगितले.