Shrivardhan-Mumbai ST bus crashes in Raigad

काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन-मुंबई ST बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घेतला आहे. रायगडमध्ये या बसला भीषण अपघात झाला. यात 16 प्रवासी जखमी झाले आहेत(Shrivardhan-Mumbai ST bus crashes in Raigad).

    काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन-मुंबई ST बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घेतला आहे. रायगडमध्ये या बसला भीषण अपघात झाला. यात 16 प्रवासी जखमी झाले आहेत(Shrivardhan-Mumbai ST bus crashes in Raigad).

    रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी १०:१५ वाजता सुटणाऱ्या एम एच १४ बीटी २७३८ या बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे साखरोने फाटा येथे बसला भीषण अपघात झाला.

    बस डारेक्ट पलटी झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला आहे. या बस मध्ये तब्बल ३० प्रवाशी होते. त्यापैकी 16 प्रवाशी जखमी झाले असून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे त्यांना हलवण्यात आले आहे. यातील तीन ते चार प्रवाशाना गंभीर दुखापती झाल्याचे समजते.