मुख्यमंत्र्यासह सोळा आमदार अपात्र होतील : नाना पटोले

राज्यातील सरकार हे फसवणुक सरकार असुन या सरकारचा निकाल हा घटनात्मक तरतुदीनुसार शेड्युल १० प्रमाणे लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार ही अपात्र ठरतील असा विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना   साहेब पटोले यांनी व्यक्त केला.

    म्हसवड : राज्यातील सरकार हे फसवणुक सरकार असुन या सरकारचा निकाल हा घटनात्मक तरतुदीनुसार शेड्युल १० प्रमाणे लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार ही अपात्र ठरतील असा विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना   साहेब पटोले यांनी व्यक्त केला.

    म्हसवड येथील कॉंग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या घरी धावती भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी वरील वक्तव्य केले, यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सोलापुर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते – पाटिल,  किसान कॉंग्रेस प्रा. विश्वंभर बाबर, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, दाऊद मुल्ला,निलेश काटे आदी प्रमुख उपस्थित होते.

    -तालुक्याने नेहमीच कॉंग्रेस पक्षाची पाठराखण
    आ. पटोले म्हणाले की, राज्यात कॉंग्रेस ला चांगले दिवस येवु लागले आहेत, माण तालुक्यात मी एका महिन्यात दुसर्यांदा येत आहे. माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणुन ओळखला जात असला तरी याच तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरघोस निधी देवुन माण तालुक्यातील सिंचन योजना मार्गी लावल्या आहेत. या तालुक्याने नेहमीच कॉंग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे, त्यामुळे येथील लोक प्रतिनिधि सध्या कोणत्या पक्षात आहेत याचे सामान्य जनतेला काहीही देणं-घेणं नाही ती काल ही कॉंग्रेस सोबत होती आज ही आहे अन्ा् उद्याही राहिल असा विश्वास व्यक्त करताना आ. पटोले यांनी येणार्या विधानसभा निवडणुकीत माण-खटावमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस चा आमदार निवडुन येईल असे स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की राज्यात महाविकास आघाडी ही भक्कम असुन यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रीत लढुन राज्य सरकार ला सत्तेतुन खाली खेचु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या सरकारने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले मात्र सत्ता येताच त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लटकवत ठेवत या समाजाची घोर फसवणुक केली असल्याचा आरोप आ. पटोले यांनी केला.

    महाविकास आघाडी मध्ये कोणताही बेबनाव नसल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी सांगितले की आम्ही स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देवु नये असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगितले होते तरी ही त्यांनी जगताप यांना आपल्या पक्षात घेतले आहे, मात्र भविष्यात कॉंग्रेस जगताप यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करणार असल्याचे शेवटी आ. पटोले यांनी सांगितले तर कर्नाटकामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस च सत्तेवर येईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    गोंजारी परिवाराने केले आ.पटोले यांचे स्वागत
    कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे जंगी स्वागत कॉंग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांनी केले, यावेळी पटोले हे सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

    यापुढे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताकत देणार
    सर्वसामान्य कार्यकर्ता हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ताकत आहे, त्यामुळे यापुढे आपण माण-खटावमधील सामान्य कार्यकर्त्याला ताकत देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी स्पष्ट केले.