MLA disqualification
MLA disqualification

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना दिले आहेत. दरम्यान सुनावणीदरम्यान न्यायालयाने नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहेत.

    एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना दिले आहेत. दरम्यान सुनावणीदरम्यान न्यायालयाने नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहेत. न्यायालय म्हणाले, “आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तरीही तुम्ही कोणताही निर्णय का घेतला नाहीत? राहुल नार्वेकरांच्यावतीने तुषार मेहतांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी वेळ वाढवून मागितला. मात्र वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

    काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?
    अजित पवार आणि इतर आमदारांचा निर्णय ३१ जानेवारीपर्यंत घ्यावा तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबर पर्यंत घ्यावा , असे निर्देश आता डी. वाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत.कोर्ट पुढे म्हणाले की, अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हालाच अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदेंविरोधातल्या ३४ याचिकांवर ३१ डिसेंबरच्या आत निर्णय घ्या. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच द्यायचा आहे. मात्र आता आम्ही वेळ मर्यादा आखून देत आहोत असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपूर्वी राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

    तुषार मेहतांनी युक्तिवाद करत दिवाळीच्या सुट्टीचा मुद्दा मांडला, हिवाळी अधिवेशन हा मुद्दाही मांडला. तरीही सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत दिली आहे. तर अजित पवार यांच्याबाबतची डेडलाईन ही ३१ जानेवारी ही ठरवून दिलं आहे.

    ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देत एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली डेडलाईन पाळली नाहीतर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोणतीही घडामोड गेल्या सहा महिन्यांत घडलेली नाही. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत असल्याचा आरोप सातत्यानं ठाकरे गटाकडून होत आहे.