
आजच्या काळातील राजकारणातील लुटारूंना पुरून उरणार बापमाणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस होय. बारामतीकर तर फक्त पेटवायचे काम करतात, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले तर शरद पवारांवर टीका केली.
सोलापूर: आजच्या काळातील राजकारणातील लुटारूंना पुरून उरणार बापमाणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस होय. बारामतीकर तर फक्त पेटवायचे काम करतात, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले तर शरद पवारांवर टीका केली. सध्याची स्थिती पाहता आरक्षणाची नव्याने मांडणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले. पंढरपूर येथे सुरू असलेल्या रयत क्रांती संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
महाराष्ट्राच्या जनता सुज्ञ असून त्यांना लुटारूंचे राज्य नको असल्याने राज्यातील कष्टकरी जनता महायुतीच्या मागे उभी राहील आणि येत्या लोकसभेत 45 पेक्षा जास्त जागा निवडून देईल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, राज्यातील लुटारू राजकारण्यांना पुरून उरणार बापमाणूस देवेंद्र फडणवीस असून त्यांना टार्गेट करण्यासाठी कितीही वेळा त्यांच्या जातीवर बोललं जातं. तरी बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम फडणवीस करत आहेत. बारामतीकर फक्त पेटवायचे काम करतात.