पिंपळगावचे पाणी यांनीच पळवले; जनक्षोभ पाहून सारवासारव : बी. जे. देशमुख

आमदार किरण लहामटे व‌ गायकर यांनी बनवाबनवीचा धंदा आता बंद केला पाहिजे. यांची दुटप्पी भूमिका पिंपळगाव लाभधारक व मुळा खोऱ्यातील जनतेच्या लक्षात आली आहे. एका बाजूला आमदारांनी पाणी पळवायचे आणि दुसऱ्या बाजूला गायकांना पुढे करून अंगलट आलं म्हणून सारवासारव करायची हा बनवाबनवीचा धंदा बंद करावा.

    अकोले : आमदार किरण लहामटे व‌ गायकर यांनी बनवाबनवीचा धंदा आता बंद केला पाहिजे. यांची दुटप्पी भूमिका पिंपळगाव लाभधारक व मुळा खोऱ्यातील जनतेच्या लक्षात आली आहे. एका बाजूला आमदारांनी पाणी पळवायचे आणि दुसऱ्या बाजूला गायकांना पुढे करून अंगलट आलं म्हणून सारवासारव करायची हा बनवाबनवीचा धंदा बंद करावा. निवडणुका आल्यावर पिंपळगावचे लाभधारक तुम्हाला जागा दाखवतील, असे पिंपळगाव बचाव कृती समितीचे बी.जे. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    देशमुख यांनी सांगितले की, पिंपळगाव संदर्भात मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्र वेळ घेतली होती. कारण तालुक्यातील आमदारांनीच निधी देऊन त्या अकरा गावे व तेवीस वाड्या़ना ६५ लाखांचा पिंपळगातून पाणी उचलण्यासाठी यांनीच पत्र दिले. गायकर आणि लहामटे दररोज एकत्र असतात मग गायकरांनी शेतकर्यांना का सांगितले नाही.

    आठ दिवसांपूर्वी कोतूळसह पिंपळगावच्या लाभधारक गावातील सरपंच व प्रमुख लोकांची बैठक मी स्वतः घेतली. तरूणांनी धरणावर आंदोलन सुरू केल्यानंतर सारवासारव करायला हे पुढे आले. अजित दादांच्या व जयंत पाटलांच्या समोर यांनी अप्पर एक टीएमसी अंबितची मागणी केली. ती पाणी शिल्लक नसल्याने होत नाही हे माहीत असताना केवळ बनवाबनवी सुरू आहे. पिंपळगावसाठी तीव्र आंदोलन केल्याशिवाय नवीन पर्याय निर्माण होणार नाही, असेही देशमुख म्हणाले.

    ‘पठार भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शासन ती योजना येथे राबवण्यासाठी आग्रही राहील यावर जनआंदोलन हाच एक पर्याय आहे.’

    – बी. जे. देशमुख, पिंपळगाव खांड बचाव कृती समिती