बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक; पेपरफुटी प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर, काय आहे प्रकरण?

बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून एकूण आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. त्यामुळं या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु आहे. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती मिळतेय.

बुलढाणा: सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. दहावीच्या पेपरमध्ये मार्काबाबत घोळ दिसून येत आहे. तर दुसरीकडे बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून एकूण आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. त्यामुळं या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु आहे. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती मिळतेय. यात अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत.

प्रकरण नेमकं काय?
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये (Buldhana Sindkhed News) बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा (HSC Maths Paper Leak) सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या संतप्त प्रतिक्रया येत आहेत. बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे.

गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. बारावी बोर्डाचा आज गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी सर्व वृत्तवाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्यान, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेलं नव्हतं. यामुळे इयत्ता बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं.