उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोनची चौकशी होणार; शंभूराज देसाई यांची घोषणा

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी 'एसआयटी' चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल, अशी घोषणा केली आहे.

    नागपूर – विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उमेश कोल्हे हत्या (Umesh Kolhe Murder Case) प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. रवी राणांनी या प्रकरणाचा तपास फिरवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे केल्याचा दावा राणांनी केला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून (Intelligence Department) चौकशी होईल, अशी घोषणा केली आहे.

    नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय होता. अमरावती शहर पोलीसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.