-फक्त एकाच शेतकऱ्याच्या गोण्यांवर टाकला युरिया
शिंगवे गावठाणानजीक दिलीप गोरडे यांच्या शेतामध्ये बांधलेल्या बराकीत तीन शेतकर्यांनी जवळपास पंधराशे कांदा गोणी साठवला होता. त्यामध्ये शिवाजी मुकींदा टाके यांच्या पाचशे गोणी कांदा साठवल्या होत्या. त्यामध्ये टाके यांच्याच कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकला. त्यामध्ये फक्त टाके यांच्याच कांद्याचे सडून मोठे नुकसान झाले. बराखीतील पाचशे गोणी कांदा सडून गेला. त्यामधून सध्या पाणी गळत आहे.
पंधरा दिवसापूर्वी टाके यांनी बराकीतील कांद्याची पाहणी केली असता त्यावेळेस कांदा सुस्थितीत होता. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा बाजारपेठेत पाठवायचे ठरवले होते. परंतू, बराकीतील कांदा सडल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेचच कांदा पिशव्यांमध्ये भरून बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली होती. त्या वेळी पुन्हा पाहणी केली असत संपूर्ण पाचशे गोणी कांदा सडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना कांदा बराकीत युरिया टाकल्याचे आढळून आले आहे.
-बाजारभावाच्या आशेने साठविला होता कांदा
टाके यांनी कांदा पिकासाठी तीन हजार रुपये किलो दराने बियाणे आणले होते. त्यानंतर सुरुवातीपासून कांदा बराकीत टाकण्यापर्यंत मजुरीचा एक लाख रुपये खर्च झाला आहे. बाजारभाव वाढीच्या आशेने कांदा बराकीतच साठवला होता. आता कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली होती. परंतु, समाजकंटकाने बराकीत युरिया टाकून शिवाजी टाके या शेतकर्याचे नुकसान केले. शुक्रवारी (दि.३०) सकाळी पोलिस पाटील गणेश पंडित यांनी बराकीत जाऊन पाहणी केली. तर बराकीतील पाचशे गोणी कांदा खराब झाला आहे.