devendra-fadnavis-ajit-pawar

पवार म्हणाले, “तुम्ही कितीही टीका केली तरी मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकासने केला आणि आमची आघाडी होती तेव्हाही केला. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळीही आम्ही तसा प्रयत्न केला,” असं अजित पवार म्हणाले.

    नागपूर – अजित पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती जाऊन टप्प्यात कार्यक्रम करण्याची जी भाषा केली त्यावरुनच पवारांनीशेलक्या शब्दांमध्ये भाजपच्या नेत्याचा समाचार घेतला.

    “भाजपामध्ये आता जे नेते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या बोलण्याचा रोख हा चंद्रशेखर बावनकुळेंच्या दिशेने होता ते पुढील वाक्यामध्येच कळून आलं. बावनकुळेंनी सप्टेंबर महिन्यात बारामतीमधूनच पवार कुटुंबियांना दिलेल्या आव्हानाचा अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे उल्लेख केला.

    पवार म्हणाले, “तुम्ही कितीही टीका केली तरी मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकासने केला आणि आमची आघाडी होती तेव्हाही केला. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळीही आम्ही तसा प्रयत्न केला,” असं अजित पवार म्हणाले.

    “पण अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशाप्रकारच्या वल्गना ते करतात. आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?” असा उपहासात्मक प्रश्न अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहून विचारला.

    “जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. मी महाराष्ट्राला माहितीय. जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना मी कुणाचंही ऐकत नाही. मी कुणाच्या बापाचंही ऐकत नाही हे पण खरं आहे. गाडी फारच फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधीही अपघात होऊ शकतो,” अशा सूचक शब्दांमध्ये अजित पवारांनी बवानकुळेंना धीराने घेण्याचा सल्ला दिला.