आज राज्य आणि देशात काय आहेत महत्वाच्या घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर…

एसटी कामगार संघटनेकडून एकदिवसीय उपोषणाची हाक देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अपूर्ण राहिलेला सामना आज खेळण्यात येईल. तर सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

    मुंबई – आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक आज होणार आहे, तर एसटी कामगार संघटनेकडून एकदिवसीय उपोषणाची हाक देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अपूर्ण राहिलेला सामना आज खेळण्यात येईल. तर सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…

    दिवसभरातील महत्त्वाचे काय…

    आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकराचे दर्शन घेणार आहेत.

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवार गटाकडून  राजेश टोपे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.

    सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे.

    सातव्या वेतन आयोगासाठी तसेच एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांसाठी एसटी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून एसटी कामगार संघटना आझाद मैदानात एकदिवसीय उपोषण करणार आहेत.

    खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देण्याऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
    आरे कॉलनीतील तीन तलावांत गणेश मूर्तींचे विसर्जन रोखावं. वसाहतीत आणि वसाहतीबाहेर मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी करत वनशक्ती या सेवाभावी संस्थेनं जनहित याचिका दाखल केली आहे,  त्या याचिकेवर सुनावणी.

    भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावात उभारण्यात आले आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. या प्रकल्पाचा आजपासून शुभारंभ होणार आहे.

    रविवार (10 सप्टेंबर) रोजी भारत आणि पाकिस्तान मधील दुसरा सामना देखील पावसामुळे अपूर्ण राहिला. तोच सामना आज म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात आला. २४ ओव्हर्सपासून सामना पुढे खेळविण्यात येणार आहे