यशोमती ठाकूर यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती जवळ येऊन उसाचा रस पिऊन उन्हाच्या झळांपासून होणारा त्रास कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि अधिकारी सुद्धा येथे थांबले. रसवंतीवर अचानक मंत्री स्वतःहून रस पीत असल्याने रसवंती चालक भारावून गेला.
अमरावती : भडकलेल्या महागाईचा चटका आणि वाढलेल्या उन्हाच्या झळा सर्वसामान्य माणसाला त्रस्त करून सोडत आहेत. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राज्याच्या मंत्री सुद्धा याला अपवाद नाहीत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर वाशिम दौऱ्यावर असताना आज एका रसवंती समोर अचानक थांबल्या. ॲड. यशोमती ठाकूर या वाशीम दौऱ्यावर असताना खेडा येथील एका रसवंती जवळ त्यांनी आपली गाडी थांबवली.
रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती जवळ येऊन आणि उसाचा रस पिऊन उन्हाच्या झळांपासून होणारा त्रास कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि अधिकारी सुद्धा येथे थांबले. रसवंतीवर अचानक मंत्री स्वतःहून रस पीत असल्याने रसवंती चालक भारावून गेला. ॲड. यशोमती ठाकूर यांनी या रसवंती चालकाची विचारपूस केली. त्याच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली तसेच त्याला काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे सांगितले. तर त्याला मदतीचे आश्वासन देऊन त्या पुन्हा आपल्या दौऱ्यावर मार्गस्थ झाल्या. मात्र, ऐन उन्हात मंत्र्यांचा असा पाहुणचार करायला मिळाल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या सहानभूती मुळे रसवंती चालक आनंदाने भारावून गेला.