“इतकी असंवेदनशीलता कुठून येते?”, अवकाळी पावसामुळं शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यांच्या मदतीवरुन संभाजीराजेंचा सरकारवर निशाणा, स्पष्टच म्हणाले…

अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे, पण अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळली नाही, यावरुन भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टिका केली आहे. संभाजीरजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी ट्विट करत सरकारचे कान टोचले आहेत.

कोल्हापूर– राज्यात अवकाळी पावसाने (Rain) गारपीटसह हजेरी लावली आहे. राज्यात 15 मार्च ते 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्या, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रसह कोकण या ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळं बळीराजाचा हातातोंडाशी  आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात वित्तहानी (Finance) झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले.अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे, पण अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळली नाही, यावरुन भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टिका केली आहे. संभाजीरजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी ट्विट करत सरकारचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले संभाजीराजे?

गुढीपाडव्यानंतर शेतकरी मदत मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या धरतीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांची व्यथा संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. ‘अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल’, असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमधून म्हणत, सरकारवर निशाणा साधला आहे.

कुठे किती नुकसान?

विदर्भात अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, भंडारासह चंद्रपूर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाले. जनावरांच्या गोठ्यांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, येवल्याला शनिवारी गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले. निफाडमधील द्राक्षबागांत गारांचा अक्षरश: थर साचला होता. खान्देशातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू, हरभरा, केळी, पपई, मका, हरभरा, ज्वारी, टरबूज, कांद्याचे नुकसान झाले. सातपुडा पर्वतरांगेतील तोरणमाळ परिसरातही गारांचा पाऊस पडला. जळगाव, नगर जिल्ह्यातही अवकाळी तडाखा बसला. तर मराठवाडात १६ हजारांवर हेक्टर पिकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, व हिंगोली जिल्ह्यात शनिवारीही गारपीट झाली. मराठवाड्यात १५ ते १७ मार्चपर्यंत तब्बल १६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. या विभागात सहा जणांचे बळी गेले आहेत. ज्वारी, गहू, मका या रब्बी पिकांसोबतच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.