मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले : राधाकृष्ण विखे पाटील

आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    शिर्डी : आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला. असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकार कोणतेही असो ते आपल्या मागण्यांपासून थोडेही दूर गेले नाहीत. प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता, हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती. भाजप सरकारने आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनायक मेटे अध्यक्ष होते. स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा त्यांचा सुरूच होता. जनसामांन्याशी बांधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

    संगमनेर भाजपचा सत्कार सोहळा रद्द

    राधाकृष्ण विखे यांचा शिंदे सरकार मधे पहिल्या क्रमांकावर शपथविधी पार पडला. त्यानंतर विखे यांचे जिल्ह्यात आगमन होताच विखेंचे जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात संगमनेर मधे पहिला भव्य सत्कार सोहळा रविवारी संगमनेर भाजपने आयोजित केला होता,त्यासाठी विखे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मेटे यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त येताच राधाकृष्ण विखे यांनी हा सोहळा रद्द करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.