वृद्ध पालकांची काळजी घेतली नाही तर तुम्हाला ‘ही’ गोष्ट पडणार महागात; याचा थेट अटॅक नोकरदारांच्या खिशावरच

प्रत्येक पालकांची फक्त एवढीच अपेक्षा असते की, आपल्या वृद्धापकाळात मुलांनी त्यांची योग्य काळजी घ्यावी पण ही घोडचुक करणाऱ्यांच्या खिशावर आता याचा थेट अटॅक होणार आहे. तुमच्या पगारात या घोडचुकीमुळे मोठ्या प्रमाणात कपात (Salary Reduction) केली जाणार आहे.

    लातूर : प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसतात. या सगळ्यात त्यांची फक्त एवढीच अपेक्षा असते की, ती म्हणजे त्यांच्या वृद्धापकाळात आपल्या मुलांनी त्यांची काळजी घ्यावी. मात्र, मुलांकडून हे कर्तव्य जाणीवपूर्वक दुलर्क्षित होतं किंवा केलं जातं.

    आता राज्यातील लातूर जिल्हा परिषदेने (Latur ZP) आपल्या ७ कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करणं सुरू केलं आहे. परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शनिवारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात (Salary Reduction) करण्याचं कारण सांगितलं. हे कारण ऐकूण तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही कपात करण्याचं कारण म्हणजे हे कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांची (Elderly Parents) योग्य काळजी घेत नाहीत किंवा त्यांचा सांभाळ करत नाहीत.

    विशेष गोष्ट ही आहे, की १२ कर्मचाऱ्यांपैकी ज्या ६ कर्मचाऱ्यांविरोधात आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ते सर्व शिक्षक आहेत. बोंद्रे म्हणाले, की या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये करण्यात आलेल्या कपातीची रक्कम त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात वर्ग केली गेली आहे अशी माहिती राहुल बोंद्रे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

    लातूर जिल्हा परिषदेनं मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या पालकांची काळजी न घेणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा ठराव गेल्या वर्षीच मंजूर केला होता. राहुल बोंद्रे म्हणाले की, अशा निष्काळजी कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनातील कपात गेल्या वर्षी डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

    बोंद्रे म्हणाले, की आम्ही १२ अशा तक्रारींची चौकशी करत आहोत, ज्यामध्ये पालकांनी त्यांची मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या १२ पैकी आम्ही ६ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच इथून पुढेही प्रत्येक महिन्याला ३० टक्के कपात सुरूच राहिल, असंही त्यांनी सांगितलं.