राज्यात १६ महिन्यात ३५ सरपंचाचा कोविड-१९ मध्ये मृत्यू : सरपंच परिषदेची राज्यपालांना माहिती

१४ सरपंचाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली या शिष्टमंडळात सहा महिला सरपंचाचा समावेश होता. सरपंच परिषदेचे दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतलेल्या या सरपंचाच्या शिष्टमंडळाने कोरोना साथ रोगात दगावलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या कुटूंबियाना आर्थिक मदत करण्याची मागणी निवेदनाव्दारे राज्यपालांना केली.

    मुंबई : कोविड -१९ च्या संसर्गाने राज्यातील ग्रामिण भागात सध्या मोठ्या प्रमाणात हातपाय पसरल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची काल भेट घेतलेल्या संरपंच परिषदेच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही महिन्यात ३५ सरपंचाचा कोविड-१९ मध्ये मृत्यू झाला आहे.

    कुटूंबियाना आर्थिक मदत करण्याची मागणी

    १४ सरपंचाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली या शिष्टमंडळात सहा महिला सरपंचाचा समावेश होता. सरपंच परिषदेचे दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतलेल्या या सरपंचाच्या शिष्टमंडळाने कोरोना साथ रोगात दगावलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या कुटूंबियाना आर्थिक मदत करण्याची मागणी निवेदनाव्दारे राज्यपालांना केली.

    या शिवाय पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबईत सरपंच भवन निर्माण करण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.