शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला अन् मुख्यमंत्री बसले मूग गिळून – भाजपने केली टीका

महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी फी सवलतीला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला. त्यावेळी सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यावरसुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी केली.

    मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना(Students) फी मध्ये सवलत(Concession In Fees) देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये(Meeting) घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikawad) यांनी मागील आठवड्यात केली होती. मात्र महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी फी सवलतीला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला. त्यावेळी सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यावरसुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी केली.

    शाळांवर कारवाईचा दिखावा
    भातखळकर म्हणाले, वीज बिलाच्या बाबतीत सवलत देणार अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याच्या बाबतीत सुद्धा केवळ चालढकल करण्याचे धोरण अवलंबले आहे.  केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे.

    कोरोनाच्या सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. यासंदर्भात आमची लढाई न्यायालयात सुरू असून न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे सुद्धा आ. अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.