राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण सेवा पुरस्कार प्रदान ; शिक्षणतज्ज्ञ तसेच समाजसेवक सन्मानित

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षण भूषण, साहित्य भूषण, समाज भूषण व सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉ प्रमोद पाण्डेय व उपाध्यक्ष डॉ आलोक चौबे प्रामुख्याने उपस्थित होते.

    माता, मातृभाषा व मातृभूमी यांप्रती प्रेम बाळगून प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य केल्यास भारताला जगातील सर्वात सुंदर देश बनवता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोज‍ित कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १८) भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवान यांना मातृभूमी भूषण सन्मान २०२१ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षण भूषण, साहित्य भूषण, समाज भूषण व सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉ प्रमोद पाण्डेय व उपाध्यक्ष डॉ आलोक चौबे प्रामुख्याने उपस्थित होते.

    अलीकडच्या काळात देशात तौते वादळ, भूस्खलन, अतिवृष्टी व करोना सारखी संकटे आली. या सर्व संकट प्रसंगी सामन्यातील सामान्य नागरिकांनी तसेच डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी परस्परांना सहकार्य केल्यामुळे या संकटांना देश धैर्याने सामोरा गेला, असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्मी डेंटल कोरच्या वीर नारी डॉ कांता मुखर्जी, हुतात्मा ले. कमांडर फिरदौस मोगल यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती कर्झीन मोगल, ग्रुप कॅप्टन त्रिलोकी भटारा, सुभेदार विनायक उपाध्ये, मास्टर चीफ एम. प्रसाद, मेजर प्रांजल जाधव, कॅप्टन के. पी. हरिदासन, कमांडर विजय वधेरा, सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर, कमोडोर बी बी मिस्त्री यांना मातृभूमी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    रॅन इंटरनॅशनल समूहाच्या प्रमुख डॉ ग्रेस पिंटो, मायाशंकर चौबे, पियुश शुक्ला, सौरभ पांडे यांना शिक्षण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युगाराज जैन यांना साहित्य भूषण तर राजाभाऊ सेठ, डॉ मुकेश गौतम, प्रशांत फुलवणे, प्रविण राय व कमलेश नाहर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    डॉ प्रकाश जाधव, डॉ बालनाथ चकोर, डॉ आनंद पांडे, वेदिका चौबे व उमेश पांडे यांना सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.