अनिल देशमुख राजीनामा द्या, भाजपची जोरदार निदर्शने, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजीी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी हा बाँब टाकल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव थेटपणे यात आल्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता भाजपनं लावून धरलीय. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार निदर्शनं केली. 

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चांगलेच अडचणीत सापडलेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर संशयाच्या सगळ्या सुया सध्या गृहमंत्री अनिल देशमुखांकडे वळल्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजप चांगलाच आक्रमक झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय.

    गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गौप्यस्फोट मुंबईचे माजीी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी हा बाँब टाकल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव थेटपणे यात आल्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता भाजपनं लावून धरलीय. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार निदर्शनं केली.

    दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून ते स्वतःचा बचाव करण्यासाठी असे दावे करत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. आपल्याला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देशमुखांनी केलाय.

    आपला दावा सिद्ध कऱण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. आपल्याला पोलीस आय़ुक्तपदावरून हटवणार असल्याचं लक्षात आल्यानंतर लगेच परमबीर यांनी खोटे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी एसीपी पाटील यांना व्हॉट्सअपवरून काही प्रश्न विचारले आणि त्याची त्यांना अपेक्षित असणारं उत्तरं मिळवली. अपेक्षित उत्तरं मिळवण्यासाठी परमबीर सिंग किती अधीर झाले होते, हे त्यांच्या संभाषणावरून दिसून येते, असं गृहमंत्री पाटील यांनी म्हटलंय.