बीबीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाला ब्रेक?, गुणरत्न सदावर्तेंनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं ‘हे’ चॅलेंज

बीडीडीचाळीतील काही रहिवाशी मात्र या घोषणेवर समाधानी नसल्याचं चित्र दिसून येतंय. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची काही रहिवाश्यांनी भेट घेतली आहे. आणि 800 चौरस फुटाचे घर मिळावे अशी मागणी केली आहे. जर 800 चौरस फुटाचे  घर मिळाले नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी देखील झाली असल्याचं मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं या प्रकल्पावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. 

    मुंबई : मुंबईत बीबीडी चाळीचं पुनर्वसन केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, वरळी विधानसभेचे आमदार अदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बीडीडीचाळ वासियांना 500 चौरस फुटाचे  टू बी एच के घर मिळणार आहे. आणि येत्या 36 महिन्याच्या बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना चाव्या दिल्या जातील अशी घोषणा देखील करण्यात आली.

    मात्र बीडीडीचाळीतील काही रहिवाशी मात्र या घोषणेवर समाधानी नसल्याचं चित्र दिसून येतंय. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची काही रहिवाश्यांनी भेट घेतली आहे. आणि 800 चौरस फुटाचे घर मिळावे अशी मागणी केली आहे. जर 800 चौरस फुटाचे  घर मिळाले नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी देखील झाली असल्याचं मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं या प्रकल्पावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

    गुणरत्न सदावर्तेंचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज

    गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘मुंबईतल्या बीडीडीचाळीतल्या रहिवाश्यांनी माझी भेट घेतली आहे. बीडीडीचाळीतील रहिवाश्यांना 800 चौरस फुटाचं घर मिळू शकतं. सरकारनं रहिवाश्यां ते घर द्यावं. एखाद्या विकासकाला फायदा पोहचेल असं धोरण असू नये. रहिवाश्यांना 800 चौरस फुटाचं घर देणं सहज शक्य आहे.   माझं सरकारला, उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांना चॅलेन्ज आहे आपण श्रमिकांना रहिवाश्यांना 800 चौरस फुटाचं घर द्यावं अन्यथा आम्ही आमची न्यायलयीन लढाई चालू करु. कश्याप्रकारे 800 चौरस फुटाचं घर देऊ शकतो याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. आम्ही श्रमिकांची बैठक बोलावली आहे. त्याचे रायटप आम्ही तुम्हाला सादर करु. आणि विकासकांच्या ओठाला पाणी लावू नका. 800 चौरस फुट घर द्या अन्यथा हा प्रोजेक्ट आम्ही चालू देणार नाही.’

    गुणरत्न सदावर्तेची कुणी भेट घेतली आम्हाला कल्पना नाही- राजू वाघमारे

    राजू वाघमारे म्हणाले की, बीडीडी चाळ वासियांकडून कोणी मागणी केली हे मला माहित नाही. आखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघ याच्या मार्फेत हा लढा मागची सात वर्ष आम्ही लढत आहोत. आम्ही 800 चौरस फुटाची मागणी केली नाही. किंवा एखादा रहिवाशी अशी मागणी करतोय अशी माहिती आम्हाला कधीच मिळाली नाही. आम्ही मागणी केली आहे 33/5  खाली आम्हाला 200 चौरस फुट जास्त मिळावं आणि ते जर शक्य नसेल तर 33/9 खालीच आम्हाला 700 चौरस फुट द्यावं. जरी 700 चौरस फुट नाही शक्य तर आम्हाला कमीत कमी 100 चौरस फुट तरी वाढवून द्यावं. 800 चौरस फुटाच्या मागणीचा आमचा कोणताही संबंध नाही. सरकार सकारात्मक आहे  प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सुरु आहे. जी आर काढण्याच्या तयारीत आहे. मात्र जर जी आर काढला नाही तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. मात्र कोर्टात जाऊन प्रोजेक्ट बंद करण्याची आम्हीच भूमिका कधीच नव्हती आणि रहिवाश्यांची देखील भूमिका तशी नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना आता जर प्रोजेक्ट सुरु होतोय तर आपण सकारात्मक असलं पाहिजे.