चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी; नवाब मलिक यांची मागणी

न्यायालय सुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही संपली असे जाहीर करा. नाहीतर पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात, अशी धमकी दिली होती. यावर मलिक यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

    मुंबई : न्यायालय सुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही संपली असे जाहीर करा. नाहीतर पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात, अशी धमकी दिली होती. यावर मलिक यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

    दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. आजपर्यंत भाजपकडून तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे.

    आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही मलिक यांनी केला. भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.