लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) कोरोनाची लस घेतल्यानंतर लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशासह राज्यात सुद्धा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. विदर्भात कोरोनाने थैमानं घातलं आहे. त्यामुळे नागपूर आणि अन्य शहरात सुद्धा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

    कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्कचा वापर करावा. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे.