सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यात महापालिका क्षेत्रं आणि जिल्हे यानुसार महाराष्ट्राची विभागणी करण्यात आलीय. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, आणि कल्याण डोंबिवली या महापालिका स्वतंत्र विभाग म्हणून गणल्या जातील. याशिवाय इतर ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हा हा वेगळा विभाग म्हणून गणला जाणार आहे.
राज्यात अनलॉकची प्रक्रिया कधी सुरू होणार आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार, या प्रश्नांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे अधिकृत आदेश जाहीर करण्यात आलाय. यामध्ये राज्यात महापालिका आणि जिल्हे यांचे विविध विभाग करण्यात आले असून पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यांच्यानुसार त्या त्या विभागाातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलाय.
राज्य सरकारच्या अधिकृत आदेशानुसार सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यात महापालिका क्षेत्रं आणि जिल्हे यानुसार महाराष्ट्राची विभागणी करण्यात आलीय. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, आणि कल्याण डोंबिवली या महापालिका स्वतंत्र विभाग म्हणून गणल्या जातील. याशिवाय इतर ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हा हा वेगळा विभाग म्हणून गणला जाणार आहे.
अशा असतील लेव्हल
लेव्हल | पॉझिटीव्हिटी दर | किती ऑक्सिजन बेड भरले आहेत | व्यवहारांची वेळ |
१ | ५ टक्क्यांपेक्षा कमी | २५ टक्क्यांहून कमी | नियमित |
२ | ५ टक्क्यांपेक्षा कमी | २५ ते ४० टक्के | बंद जागा वगळता नियमित |
३ | ५ ते १० टक्के | ४० टक्क्यांहून अधिक | संध्याकाळी ५ वाजेपर्यंत |
४ | १० ते २० टक्के | ६० टक्क्यांहून अधिक | संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मात्र विकेंडला बंद |
५ | २० टक्क्यांपेक्षा जास्त | ७५ टक्क्यांहून अधिक | जैसे थे स्थिती |
यासाठी निकष दर गुरुवारी तपासले जातील.गुरुवारच्या स्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. गुरुवारी जी स्थिती असेल, त्याचा आढावा घेऊन सोमवारपासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.