ग्रामसेवक – ग्रामविकास अधिका-यांच्या कायम प्रवास भत्यात चारशे रूपये वाढ : राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय

ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या अकराशे रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करण्यात आली आहे. या प्रवास भत्त्यात वाढ करुन तो १५०० रुपये इतका करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

    मुंबई : ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पुर्ततेसाठी ग्रामसेवकांना तसेच ग्राम विकास अधिका-यांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या अकराशे रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करण्यात आली आहे. या प्रवास भत्त्यात वाढ करुन तो १५०० रुपये इतका करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

    मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी

    ग्राम पंचायतस्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भुमिका ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.  तसेच, ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्य संबंधीत साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालूका स्तरावर जावे लागते.

    ग्रामसेवकांना फिरती करावी लागते
    बचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते.  ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पुर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्यामध्ये चारशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे.