जातीय द्वेषातून खुनाचा गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई - महाराष्ट्रात जातीय द्वेषातून दलितांवर जीवघेणे हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूर येथे अरविंद बनसोड यांच्या हत्येनंतर आता पुण्यातील

मुंबई – महाराष्ट्रात  जातीय द्वेषातून  दलितांवर  जीवघेणे हल्ले  होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूर येथे अरविंद बनसोड  यांच्या हत्येनंतर आता पुण्यातील   पिंपरी-चिंचवडमधील अवघ्या वीस वर्षांच्या तरुणावर  जातीय द्वेषातून सामूहिक हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्यात आले. जातीय द्वेषातून दलित तरुणांची  हत्या  करणाऱ्यांना फाशीची  कठोर शिक्षा करावी अशी  मागणी पब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे हत्या करण्यात आलेल्या युवक दिवंगत विराज जगताप या कुटुंबियांची  संत्वनपर भेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज  शनिवारी दि.१३ जून रोजी घेणार आहेत. त्यासाठी आज  दि.१३ जून रोजी दुपारी ना. रामदास आठवले यांचे पिंप्री चिंचवड येथील पिंपळे सौदागर  येथे आगमन होणार आहे.   दिवंगत विराज जगताप या २० वर्षांच्या युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ना.रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांशी चर्चा करून गुन्हेगारांना  शिक्षा करण्याची मागणी केली आहे.