तुमचं अभिनंदन कसं करू? जाणून घ्या नितीन गडकरींना राग का झाला अनावर?

मुंबई (Mumbai). केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले.

मुंबई (Mumbai). केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले.

उद्घाटनानंतर बोलताना गडकरी म्हणाले,”अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झालं आहे. सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,” असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.

“८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कामाला तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. पण मला याची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे लोक (अधिकारी) आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. हे सगळे १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, त्यांचे मार्गदर्शक हे लोक बनतात. जे पूर्णपणे नकारात्मक आणि विकृत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारलं जातं, हे मला कळत नाहीये. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचं उदाहरण म्हणजे ही इमारत आहे. हे काम ज्यांनी पाहिलं, त्याचा एक संशोधन पेपर तयार करावा. आपण जे लोक घेतो, लायक नाहीत. या संस्थेचं इतकं नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत,” असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

“माझं नाव बदनाम झालंच आहे. मला रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती आहे. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे काम पूर्ण झाले बघण्यासाठी तीन सरकारं बदलून गेली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू. मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय” अशा शब्दात गडकरींना अधिकाऱ्यांना सुनावलं.