पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही. आताची मुले काय ट्विट करतात, त्यावर तुम्ही विचारता की तुमच्या मुलाने हे ट्विट केले. तुमच्या मुलानं ते ट्विट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकरच्या जबाबदाऱ्या आहेत.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री पार्थ पवार यांचे सुपुत्र पार्थ पावर यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर ट्विट (Parth Pawar’s tweet) केले. यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे की, मला तेवढाच उद्योग नाही, मला राज्यात अनेक प्रकारची कामे (responsibilities ) आहेत. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही. आताची मुले काय ट्विट करतात, त्यावर तुम्ही विचारता की तुमच्या मुलाने हे ट्विट केले. तुमच्या मुलानं ते ट्विट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकरच्या जबाबदाऱ्या आहेत. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो. आणि प्रत्येकाने काय आणि कशावर ट्विट करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
तसेच मराठा समाज असो किंवा धनगर समाज असो ज्याला त्याला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे अशीच आमचीही भूमिका आहे. असे अजित पवारांनी म्हटले आहे.
काय ट्विट केले होते पार्थ पवार यांनी, जाणून घ्या
विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही. मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र” असे ट्विट पार्थ पवारांनी केले होते.
‘विवेकची आत्महत्या ही दुर्दैवी घटना असून या दुर्दैवी घटनांचा मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे’ असे पार्थ पवारांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
यापूर्वीही पेटले होते पार्थ यांचे ट्विट प्रकरण
दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महात्या प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्यासाठी देखील पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी पत्र देऊन सुशांतची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. यामुळे देखील राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. सुशांतची तपासणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे वर्ग केल्यावर पार्थ यांनी पुन्ही एकदा “सत्य मेव जयते” असे सूचक ट्विट केले होते. तेव्हापासून पार्थ पवार यांचे ट्विट प्रकरण चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे.