टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा : विजय वडेट्टीवार

    मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रसने आपली सत्ता राखली आहे. भाजप आणि ममता यांच्या तृणमूल काँग्रसमध्ये टक्कर होईल असं वाटत होतं मात्र तसं काही न होत ममता यांनी एकहाती निवडणुक जिंकली. यावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

    वडेट्टीवार म्हणाले की, बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी पाटलांना हाणला आहे. यावेळी अदर पुनावाला यांनी आलेल्या धमकीवरही वडेट्टीवारांनी आपली मत मांडलं.

    नागपुरात कोरोनाचे 5 स्ट्रेन

    दरम्यांन केंद्र सरकारचं लसीकरणाचं नियोजन बिघडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठी चपराक दिली आहे. सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता फक्त घोषणा केली जाते. नागपुरात कोरोनाचे 5 स्ट्रेन पाहायला मिळाले आहेत. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आशिष शेलार यांनी अदर पूनावाला यांना कुणी धमकावलं याचा भांडाफोड करावाच, असं आव्हान वडेट्टीवारांनी केलं आहे. तसेचं निवडणुकांचे योग्य नियोजन केलं असतं तर कोरोना वाढला नसता. 5 राज्याच्या निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असंही वडेट्टीवार म्हणाले.