वारकऱ्यांच्या मागणीनुसार आषाढी वारीच्या कार्यक्रमाचे लेखी आदेश जारी; वाखरीपासून दीड किमी पायी वारीला परवानगी

मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान कण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लेखी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यात वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    मुंबई : मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान कण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लेखी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यात वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णयाचा लेखी आदेश आज राज्य सरकारने जारी केला.

    यंदाही आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी न देता यंदा एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय प्रमुख वारकरी संस्थाना नी घेतला मात्र काही अटी घातल्या होत्या त्यानुसार याबाबतचा लेखी आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे.

    आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असे राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार आहे. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे.

    हे सुद्धा वाचा