भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही; राष्ट्रवादीने सर्वात जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा जयंत पाटील यांचा दावा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

मुंबई : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

१३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये  ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. काँग्रेस १९३८, भाजप २९४२, शिवसेना २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी तळागाळातील पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही असेही जयंत पाटील म्हणाले.