‘आपडो नव्हे, थपडा खाणारे आणि थापा मारणारे हे थापडो सरकार’, केशव उपाध्येंनी केली टीका

 महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे असे थापडो सरकार झाले आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये(keshav upadhye criticized thakre government) यांनी केली आहे. सरकारने मारलेल्या थापांसंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे असे थापडो सरकार झाले आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये(keshav upadhye criticized thakre government) यांनी केली आहे. सरकारने मारलेल्या थापांसंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

 

केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पाहत असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे.”


आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात की, “न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ती मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती वाढतच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशी ठरविण्याचा काल आलेला निर्णय ताजा आहे. त्याशिवाय पदवी परिक्षा, ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक, मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, कंगना प्रकरणात न्यायालयाकडून सरकारला मिळालेल्या थपडा तसेच मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आलेले अपयश ही सुध्दा थप्पडच आहे.”

पुढे ट्विटद्वारे टीका करताना ते म्हणतात की, “एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकरी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा अनेक थापा सरकार जनतेला देत असून याची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच झाली आहे.”