महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.१ टक्क्यावर

मुंबई : बुधवारी राज्यात ४,३०४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  तर, आज राज्यात ४,६७८  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे बरे ९४.१ % एवढे झाले आहे.

राज्यात आतापर्यंत १७,६९,८९७ कराेना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. बुधवारी राज्यात ९५  करोना मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८०,८९३ झाली आहे. राज्यात एकूण ६१,४५४  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात बुधवारी ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ९५  मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू  हे मागील आठवड्यातील आहेत.

उर्वरित २१ मृत्यू  हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २१ मृत्यू  नागपूर- ५,  औैरंगाबाद-५, सोलापूर-३, अहमदनगर-३, जळगाव-१, नाशिक- १, परभणी-१, रायगड-१ आणि वर्धा -१ असे आहेत.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१८,७१,४४९ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १८८,८०,८९३ (१५.८४ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०९,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईन असून ३,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.