मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२० च्या जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण २० जुलै रोजी राजभवनात

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२०च्या  जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण २० जुलै रोजी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. या पत्रकार पुरस्कारांचे वितरण दरवर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाते. मात्र कोरोना स्थितीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यबहुलतेमुळे वेळ देवू न शकल्याने अखेर सहा महिने उशीराने राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जात आहे.

    मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२०च्या  जीवनगौरव तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण २० जुलै रोजी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. या पत्रकार पुरस्कारांचे वितरण दरवर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाते. मात्र कोरोना स्थितीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यबहुलतेमुळे वेळ देवू न शकल्याने अखेर सहा महिने उशीराने राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. यंदा माजी अध्यक्ष तसचे विख्यात लेखक चित्रकार आणि चाळीस वर्षे राजकीय पत्रकारितेची उत्तुंग शिखरे गाजवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना २०२० चा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    लेखक, पत्रकार, चित्रकार, समिक्षक अष्टपैलू व्यक्तिमत्व

    प्रकाश बाळ जोशी यांनी १९७२ साली पत्रकारितेला केसरीतून सुरुवात केली. सकाळ, फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्प्रेस, द डेली आदि मराठी व प्रामुख्याने इंग्रजी वर्तमानपत्रां बरोबरच २५ वर्षे टाइम्स ऑफ इंडियामध्ये जेष्ठ राजकीय वार्ताहर व विष्लेषक म्हणून कामगिरी बजावली आहे. दहा वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी चित्रकार म्हणून एका नवीन इंनीग्जला सुरुवात केली आणि त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक कमावला. प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘कथा” या कथा संग्रहास राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. या कथा संग्रहाचे इंग्रजीत “Mirror in the Hall” नावाने भाषांतर झाले आहे. गुजराती, हिंदी, फ्रेंच आणि मल्याळम आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. पत्रकारितेत कार्यरत असताना पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक लढ्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघ आदी संघटनांवर त्यांनी अध्यक्ष, कार्यवाह अशा महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

    उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२०

    याशिवाय राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधीसाठी देण्यात येणारा पत्रकारिता पुरस्कार किरण तारे, इंडिया टुडे, यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी पुरस्कार सिद्धार्थ गोदाम, न्यूज १८ लोकमत, औरंगाबाद यांना जाहीर झाला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असणारा उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार चंदन शिरवाळे,पुढारी ,मुंबई यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून प्रकाश सावंत, सदस्य इंद्रकुमार जैन व सदस्य सचिव म्हणून सचिन गडहिरे यांनी काम केले.

    मुख्यमंत्र्यानी टाळल्याची चर्चा

    दरम्यान, या पत्रकार पुरस्कारांचे वितरण दरवर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाते. मात्र कोरोना स्थितीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यबहुलतेमुळे वेळ देवू न शकल्याने अखेर सहा महिने उशीराने राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जात आहे. पत्रकारांना कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा, रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, तसेच त्यांच्या लसीकरणासाठी सरकारने पुढाकार घ्यावा या सारख्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्य सरकारकडून टाळ ले जात असल्यानेच मुख्यमंत्र्यानी या पत्रकारांच्या राज्यस्तरीय संघटनेला वेळ देण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.