‘आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ’, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

    याच पार्श्वभूमीवर स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

    शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे. निवडणुका येतात आणि जातात. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात. बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.