राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगून राष्ट्रपती राजवट लावा; नितेश राणेंचा टोला

उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. तसेचं कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

    मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

    नितेश राणे काय म्हणाले ?

    उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. तसेचं कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

    राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी

    केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने कोकणाला पॅकेज द्यावे जेणे करून कोकणाला आधार मिळेल. केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती मिळावी सुद्धा. निसर्ग चक्रीवादळावेळी राज्य सरकारने 25 कोटींची मदत जाहीर केली. पण अजूनही एकही दमडी आली नाही. तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, पण ती मदत मिळेल असे मला वाटत नाही, असं सांगतानाच काल मुख्यमंत्री कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळून मुंबईला परत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

    नुकसान झालेल्या ठिकाणी मुख्यमंत्री गेलेच नाही

    मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? मालवणमध्ये वायरी गावात लोक सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची वाट पाहात होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमिनीवर उतरले, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुळात याला दौरा म्हणू शकता का?, संतप्त सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री एखाद्या भागात येतात तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात. हे दुःख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दुःख पुसणारे नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

    लिपस्टिक नव्हे, पावडर दौरा

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात फिरत होते. मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा केला का? घराबाहेर पडून स्वतःच्या कपड्याची इस्त्री मोडू न देता ते परत घरी गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा असा दौरा कुणी पहिला नसेल, असं सांगतानाच मी तुमच्याच चॅनलवर म्हणालो होतो की मुख्यमंत्र्यांचा हा दौरा लिपस्टिक दौरा आहे. त्यापेक्षाही भयंकर असा हा पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा, अशी खोचक टीका त्यांनी केली.

    एकनाथ शिंदेंकडून काही तरी शिका

    कोकणातील जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. पण उद्धवजींनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नात उद्धवजींना कळलं असतं तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धवजींपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. शिंदेंनी किमान कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यामुळे बाळासाहेबांचा मूळ शिवसैनिक कसा असतो हे शिंदेंनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभारच मानेन. त्यामुळे शिंदेंकडून काही तरी शिका, असा माझा मुख्यमंत्र्यांना सल्ला राहीन, असा चिमटाही त्यांनी काढला.