एल्गार परिषद चालते, शिवजयंतीला विरोध का? राम कदमांचा सवाल

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारावर टीकेची झोड उडवली आहे.

    मुंबई : १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारावर टीकेची झोड उडवली आहे.

    शिवजयंतीत १० हून अधिक जणांना सामील होऊ नये, ११ वा व्यक्ती समाविष्ट झाला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं सरकारने नियमावलीत म्हंटले आहे. ज्यांच्या नावाने पक्ष चालवला आणि राज्यात सत्ता स्थापन केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. यादिवशी शिवसेना सरकारने एक तुगलकी फर्मान काढलं आहे. शिवसेने हे फर्मान मागे घ्यावं असेहा राम कदम म्हणाले.

    महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंचा अपमान होत आहे. तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी देता, रेल्वे-बसमधील गर्दी चालते, शेतकरी मोर्चाला परवानगी देता. मात्र शिवजयंतीला परवानगी नाही? हे कुठले तुमचे तुगलकी निर्णय? आम्ही राज्यात थाटामाटात शिवजयंती साजरी करू असेही राम कदम म्हणाले.

    काय आहे नियमावली

    • छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
    • यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
    • सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
    • करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
    • महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
    • फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
    • आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी