मुंबई महापालिकेवर भगवा फडकतचं राहणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई महापालिकेवर भगवा फडकतचं राहणार, मुंबई महापालिकेत मागील २५ ते ३० वर्षे परफेक्ट कार्यक्रम सुरूचं आहे. तो यापुढेंही सुरूच राहणार. कोणी कितीही प्रयत्न केले तरी, आमचा कार्यक्रम होणार नाही. मुंबईवर भगवा फडकतो आहे आणि तो यापुढेही फडकत राहणार, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

    मुंबई : मुंबई महापालिकेवर भगवा फडकतचं राहणार, मुंबई महापालिकेत मागील २५ ते ३० वर्षे परफेक्ट कार्यक्रम सुरूचं आहे. तो यापुढेंही सुरूच राहणार. कोणी कितीही प्रयत्न केले तरी, आमचा कार्यक्रम होणार नाही. मुंबईवर भगवा फडकतो आहे आणि तो यापुढेही फडकत राहणार, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यांन संजय राऊतांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली आहे. म्हणाले की, कोविड लसीचा पुरवठा असेल किंवा अन्य काही मदतीचा हात असेल तेंव्हा महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय होत आहे. हे मी बोलणे योग्य नाही पण कोविड टास्क फोर्सचे प्रमुख शशांक जोशी यांनीचं तशी भूमिका मांडली आहे. याबाबत राज्य सरकारने आवाज उठवला पाहिजे, असं राऊत बोलत होते.

    राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लसीकरणाचा वेग कमी आहे. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. यावेळी शिवसेना नेते संजय राऊतांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कोविडची साथ आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला राज्यात कोविड वाढतोय म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडं केंद्र सरकारने कुठलेही सहकार्य करायचे नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणूनच हे सगळे सुरू असल्याचं राऊत म्हणाले.

    दरम्यान कोविडची साथ आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला राज्यात राज्यात कोविड वाढतोय म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडं केंद्र सरकारने कुठलेही सहकार्य करायचे नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणूनच हे सगळे सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला.