हे काय ऐकतोय मी, की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत, संपादक धमक्या देतो आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतात. शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, मोजून बघा. मोबाइलचे बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर 'जय महाराष्ट्र' म्हणतात की 'होम मिनिस्टर' म्हणतात तेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात? असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.
मुंबई : शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या जहरी टीकेला भाजपा नेते नीलेश राणे यांनी जशासतसे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, यायचे असेल तर या मग, असा इशारा दिला होता. त्यावरून राणेंनी राऊतांना शब्दांचे फटकारे हाणले. राऊतांना आता शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ, असा थेट इशाराच राणे यांनी दिला आहे.
हे काय ऐकतोय मी, की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत, संपादक धमक्या देतो आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतात. शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, मोजून बघा. मोबाइलचे बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात की ‘होम मिनिस्टर’ म्हणतात तेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात? असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.
तत्पूर्वी, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सज्जड दम दिला होता. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचे कळले आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच राऊत यांनी दिला होता. महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो, ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असे कोणतेच विधान करणार नाहीत. मूळ भाजपाचे लोक असे विधान कधीच करणार नाही. फडणीस असतील शेलार असतील, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहाही असतील, कोणीही असे विधान करणार नाही. जे बाहेरून आलेले लोक आहेत, जे बाटगे आहेत, ते आपली निष्ठा दाखवण्यासाठी असे विधान करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.
जे महत्त्व हुतात्मा स्मारकाला आहे, साधारण तिच भावना लोक शिवसेना भवनाविषयी व्यक्त करीत असतात. आता ते भूमिगत झाल्याचे कळते. कुणाला एवढी खूमखूमी आली असेल, कुणाला झटका आला असेल आणि हिंमत असेल तर समोर या. पण स्वत:च्या पायावर याल आणि खांद्यावर जावे लागेल. शिवसेना भवन हे प्रखर राष्ट्रवादाचे प्रतिक आहे. ते तोडण्याफोडण्याची भाषा नतद्रष्टच करू शकतात. बाटगेच करू शकतात.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना