शेतकऱ्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करा; उर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश

मागेल त्या शेतकऱ्यांला नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात वीज जोडणी देण्यास प्राथमिकता देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी अर्जावर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. 

    मुंबई : मागेल त्या शेतकऱ्यांला नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात वीज जोडणी देण्यास प्राथमिकता देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी अर्जावर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

    या निर्णयामुळे कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

    शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे हे उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन नवीन कृषिपंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार करण्यात आले आहे.

    आता मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी पुरेसे वीज उपकेंद्र व रोहित्रे उभारण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.