२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.
मुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 25, 2021
२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.