मुंबई विद्यापीठ आणि 'आयसीएसएसआर'
मुंबई विद्यापीठ आणि 'आयसीएसएसआर'

आदिवासींचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचे प्रश्न, बदलत्या चालीरिती याबद्दल सर्वसामान्य नागरिक अनिभज्ञ असतात. ज्यामुळे त्यांच्या एकंदरीत जीवनावर व त्यांच्या समाज जीवनाचा अभ्यास व्हावा याउद्देशाने आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे. हे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

मुंबई (Mumbai). आदिवासींचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचे प्रश्न, बदलत्या चालीरिती याबद्दल सर्वसामान्य नागरिक अनिभज्ञ असतात. ज्यामुळे त्यांच्या एकंदरीत जीवनावर व त्यांच्या समाज जीवनाचा अभ्यास व्हावा याउद्देशाने आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे. हे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

मोठ्या प्रमाणात शहरीकरण सुरु आहे. यात गृह उद्योग, रस्ते बांधकामे होत आहेत. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यामुळे जंगलाबरोबरच वन्यजीव, वनस्पती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. परिणामी पर्यावरणात सातत्याने बदल होत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम आदिवासींच्या जीवनावर होत आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवन बदलू लागले आहे. आदिवासींमध्ये वारली, कातकरी यांनी आपली संस्कृती अद्यापपर्यंत टिकवून ठेवली होती. मात्र बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे आदिवासींच्या समाज जीवनात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे समकालीन प्रश्न, बदलत्या चालीरीती, पर्यावरणात होणारे बदल ह्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवन पद्धतीवर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च व मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील आदिवासीच्या समाजजीवनचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी पालघर येथे अभ्यास दौरा केला. संशोधन प्रकल्पात मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. नमिता निंबाळकर, अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. मेधा तापियावाला, समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. रिटा मालचे आणि संशोधन सहाय्यक अंजली सिंह, हर्शिता झाला ह्यांचा समावेश आहे. या संशोधन प्रकल्पामध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूर शिक्षण केंद्राचे सहाय्यक कुलसचिव अमेय महाजन यांच्यावर मार्गदर्शकाची जबाबदारी सोपविण्यात आली असून ह्या संशोधन प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील कौस्तुभ घरत आणि भालचंद्र साळवे हे क्षेत्रकार्य समन्वयक म्हणून काम पहाणार आहेत.