मुख्यमंत्री कुठे फारसे फिरत नाहीत तर स्वतःपासून आदर्श घालून द्यावा : चित्रा वाघ यांच्याकडून खासदार राऊत यांच्या विधानाचा समाचार

तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील आस्तित्व बिहार निवडणूकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचय संजय जी   की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत.   

    मुंबई: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या केंद्रीय नेत्यांच्या सुरक्षेबाबतच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
    ‘सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो. हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे.

    स्वतःपासून आदर्श घालून द्यावा
    तरी आपणास असे खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?  गेली दीड वर्ष मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही. तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील आस्तित्व बिहार निवडणूकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचय संजय जी   की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत.

    आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणा
    आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे त्यांना हेलपाटा मारावा लागतो. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा संजयजी असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.