दानवे काय शुद्ध घी वाले आहेत काय? राज्यमंत्री बच्चू कडूंचे भाजपवर टीकास्त्र

शरद पवार, राज ठाकरेंवर चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांची चौकशी सुरु आहे. मग दानवे काय शुद्ध घी वाले आहेत काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. कारवाईवर बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार, राज ठाकरेंवर चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांची चौकशी सुरु आहे. मग दानवे काय शुद्ध घी वाले आहेत काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असा टोला लगावला होता.