devendra fadnavis

व्हॅलेंटाइन डे ला विरोध करणारी शिवसेना आणि जोडप्यांना मारझोड करणारी शिवसेना आज लव्ह जिहादच्या मुद्द्यावर जी भूमिका घेते आहे ती भूमिका त्यांच्या अधःपतनाचा वेग दर्शवणारी आहे असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई : व्हॅलेंटाइन डे ला विरोध करणारी शिवसेना आणि जोडप्यांना मारझोड करणाऱ्या शिवसेनेला लव्ह जिहादच्या बाबतीत बिहारच अनुकरण का करायचे? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

सत्ता आली की माणसं कशी बदलतात हे शिवसेनेकडे पाहून समजत असा टोलाही फडणवीस लगावला आहे. व्हॅलेंटाइन डे ला विरोध करणारी शिवसेना आणि जोडप्यांना मारझोड करणारी शिवसेना आज लव्ह जिहादच्या मुद्द्यावर जी भूमिका घेते आहे ती भूमिका त्यांच्या अधःपतनाचा वेग दर्शवणारी आहे असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लव्ह जिहादचा कायदा बिहारमध्ये झाला तर महाराष्ट्रात करु असंही संजय राऊत म्हणाले. “बिहारमध्ये जे काही होणार आहे ते हे करणार आहेत का? आश्चर्याची बाब ही आहे की एवढा प्रगत महाराष्ट्र आहे आणि तरीही यांना बिहारचं अनुकरण करावंसं वाटतंय? सत्ता आल्यावर माणसं कशी बदलतात याचं हे उदाहरण आहे” हे सरकार पडण्याची आम्ही वाट बघत नाही. हे सरकार आपल्या वजनाने पडेल असलं सरकार चालत नसतं. हे सरकार ज्यादिवशी पडेल त्यावेळी आम्ही सरकार स्थापन करु असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.