उस्मानाबाद

Adv. Revan Bhosale महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी उध्वस्त केला : ॲड. रेवण भोसले
विदर्भ-मराठवाड्यात महापूर आला, कोकणला चक्रीवादळाचा तडाखा बसला ,टोळधाड आली, मरणाऱ्यांची प्रेतही नातेवाईकांच्या ताब्यात आली नाहीत, जी आली त्यांचे अवयव काढून घेतले होते, अवकाळी पावसाने हातात तोंडासी आलेला घास हिरावून घेतला तरीही शेतकऱ्याला काही मदत सरकार करायला तयार नाही परंतु मंत्र्यांच्या बंगल्याला वीज सवलत मिळाली ,आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले, इतकेच नाही तर माजी आमदार ,मंत्री यांना ४० टक्के पेन्शन वाढ झाली.