Corona-death

संजय कुमार नायक याचा विवाह ११ मे रोजी पार पडला. त्याचं लग्न बेगलोर येथे पार पडले त्यावेळी त्याला ताप आणि करोनाची लक्षण होती. लग्नानंतर प्रकृती बिघडल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. १३ मे रोजी त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्याला घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होते. रम्यान तब्येत बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा १५ मे राजी मृत्यू झाला.

    भुवनेश्वर: देशातील करोना दुसऱ्या लाटेचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. अनेक ठिकाणी उपचारा अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होताना दिसत आहे. ओडिसातील भुवनेश्वर येथे मन विषाण्ण करणारी घटना समोर आली आहे. २६ वर्षीय तरुणाचा लग्नाच्या पाचव्या दिवशी मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. तसेच लग्नाला हजर असणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने देखील लग्नात उपस्थित असलेल्या लोकांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
    राजकनिका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात संजय कुमार नायक याचा विवाह ११ मे रोजी पार पडला. त्याचं लग्न बेगलोर येथे पार पडले त्यावेळी त्याला ताप आणि करोनाची लक्षण होती. लग्नानंतर प्रकृती बिघडल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. १३ मे रोजी त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्याला घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होते. लग्नानंतर पाचच दिवसात नवदाम्पत्याचा संसार विस्कटला आहे .
    दरम्यान तब्येत बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा १५ मे राजी मृत्यू झाला. मृत नवरदेवाच्या घरातील सर्वांचे चाचणीसाठी नमूने घेण्यात आले असून अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा आहे.