जवळपास १० दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांच्या अपहरण केल्याचे सांगितले जात होते. ७ युवक सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी ५ युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.
अरुणाचल प्रदेश : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) अरुणाचल प्रदेशमधूम (Arunachal Pradesh) गायब झालेल्या ५ युवकांना (Five youths) परत मायदेशात सोडले आहे. पाचही जणांना भारतात सोडण्यात आले आहे. ते १ तास अंतर पायी चालल्यावर किबिथू सीमा चौकी येथे पोहचतील.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, अरुणाचल प्रदेशमधून हरवलेल्या ५ युवकांना पीएलएने भारतात परत पाठवणार असल्याचा दावा केला होता. संबंधित युवक त्यांच्या भागात पोहोचले होते.
The Chinese PLA has confirmed to Indian Army to hand over the youths from Arunachal Pradesh to our side. The handing over is likely to take place anytime tomorrow i.e. 12th September 2020 at a designated location. https://t.co/UaM9IIZl56
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 11, 2020
जवळपास १० दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगितले जात होते. ७ युवक सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी ५ युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.