गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महसूल मंत्री आर अशोक यांनी पूर्णविराम दिला आहे.
बंगळुरू: ‘आजच्या घडीला तरी राज्यात नेतृत्वबदलासाठी कोणी पर्याय आहे, असं मला वाटत नाही. ज्या दिवशी भाजपच्या हायकमांडकडून मला आदेश मिळतील त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल.’ असं वक्तव्य करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पा यांनी राज्यातील नेतृत्व बदलाबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
याबरोबरच ‘बीएस येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. त्यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा आता थांबवायला हव्यात’. अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांनी जोर धरला होता. या चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि महसूल मंत्री आर अशोक यांनी पूर्णविराम दिला आहे.
हे सुद्धा वाचा
- Vanita Kamble Vanita Kamble कंटेन्ट रायटर …मग ठरवू आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते; उदयनराजेंनी स्पष्ट केली भूमिका आधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते ठरवू, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. छत्रपती घराण्यातील खा. संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा : आधी राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कुणी करायचे ते ठरवू, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. छत्रपती घराण्यातील खा. संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करा उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला. संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना?, असे उदयनराजे म्हणाले. कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण द्या मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होते हे चुकीचे, असे ते म्हणाले. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक काय करतील? लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. आज अनेकजण फास लावून घेतात, मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकर्त्याना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार खोटे बोलून दिशाभूल करते मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तो राज्याचा विषय आहे. सरकार खोटे बोलून दिशाभूल करत आहे, असे सांगतानाच मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच मराठा समाज हा महाराष्ट्रात मोठा समाज आहे. राजस्थानात मारवाडी बहुसंख्य आहेत. या समाजातील खासदार, आमदारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण लागू होत नाही. मात्र सरकारने गरिबांना तरी आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. हे सुद्धा वाचा क्षणात 180 कोटींचा महामार्ग पडला दरीत; डोंगराचा कडा कोसळला Published: June 6, 2021 05:18 PMUpdated: June 6, 2021 05:20 PM टॉपिक:महाराष्ट्रसातारा Comments by TaboolaSponsored LinksYou May Like City Of Hope — Turning Bali’s ‘Disgrace’ Into Pride Our Better World A new age of intelligence. Dell ATTN: Salary Day offer on Best Selling Sheesham Beds.Up to 33% Discount. Wakefit Coding Classes for Kids Age 6-18 from IIT/Harvard Team Campk12 Finding a Job in the USA from India Might be Easier Than You Think Job in the USA | Search Ads Follow The NFL 2020 Season Finals By Using These Top 5 VPNs In Pune TheTopFiveVPN Advertisement
येडियुरप्पा यांच्या राजकीय खेळीमुळे कर्नाटकमधील जेडी(एस) व काँग्रेसने एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार कोसळले. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यात आलं