अमित शहांच्या अडचणीत वाढ ; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने शहांना बजावले समन्स!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालच्या एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. शहा यांनी २०१८ ला एका भाषणामध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात अनेक आरोप केले होते. अभिषेक बॅनर्जी यांनी याच आरोपांवर आक्षेप घेत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

    कोलकाता (Kolkata).  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालच्या एका न्यायालयाने समन्स बजावले आहे. शहा यांनी २०१८ ला एका भाषणामध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात अनेक आरोप केले होते. अभिषेक बॅनर्जी यांनी याच आरोपांवर आक्षेप घेत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

    अभिषेक यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार कोलकाताच्या विशेष न्यायालयाने अमित शहा यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अमित शहा यांच्या नावाने एक समन्स बजावून त्यांना हजर राहण्यास विधान नगर येथील विशेष न्यायालयाने सांगितले आहे. विधाननगर न्यायालय हे आमदार आणि खासदारांचे प्रकरण निकाली लावण्यासाठी तयार करण्यात आलेले न्यायालय आहे.

    शहा यांनी खोटे संदर्भ दिले आणि मुख्यमंत्र्यांचा पुतण्या असा उल्लेख करत बिनबुडाचे आरोप केल्याचं अभिषेक बॅनर्जी यांनी त्याच्या दाव्यात म्हटलं आहे. अमित शहा यांना आता विशेष न्यायालयात हजर राहणं बंधनकारक असून निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्याने त्याचा पक्षावर परिणाम होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.